बुधवार, ८ एप्रिल, २०२०
शुक्रवार, ३ एप्रिल, २०२०
At 9 AM tomorrow morning, I’ll share a small video message with my fellow Indians.
— Narendra Modi (@narendramodi) April 2, 2020
कल सुबह 9 बजे देशवासियों के साथ मैं एक वीडियो संदेश साझा करूंगा।
रविवार, २९ मार्च, २०२०
'करोना ' ला रोखण्यासाठी आणखी काय उपाय करायला हवे ?
१. सतत हात स्वच्छ सनिटायझर ने धुवावे.
२. बाहेर जाताना मास्क लावावा.
३. शक्यतो बाहेर जाणे टाळावे.
४. तीन पेक्षा जास्त दुसऱ्या व्यक्ती पासून अंतर ठेऊन राहावे.
५. आसपास स्वच्छता राखा.
६. स्वतः बरोबर कुटुंबाची ही काळजी घ्या.
७. कोरडा खोकला, कफ, ताप वगैरे जाणवत असल्यास लगेच हॉस्पिटल बरोबर संपर्क टाळावा.
![]() |
| https://www.who.int/emergencies/diseases/novel-coronavirus-2019 |
![]() |
| https://www.who.int/emergencies/diseases/novel-coronavirus-2019 |
शुक्रवार, २० मार्च, २०२०
रविवार, २६ जानेवारी, २०२०
प्रजासत्ताक दिनाच्या भारतीयांना हार्दिक शुभेच्छा...❤🇮🇳🚩
।। जय हिंद जय भारत.।।
प्रथम प्रजासत्ताक दिन म्हणजे काय हेच माहिती करून घ्याला पाहिजे कारण अनेक जणांना प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्यदिन यातील फरक माहित नसतो.
भारतीय प्रजासत्ताक दिवस हा भारताच्या प्रजासत्ताकात दरवर्षी २६ जानेवारी रोजी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे. याला गणराज्य दिन असेही म्हटले जाते. भारताचे संविधान संविधान समितीने २६ नोव्हेंबर, इ.स. १९४९ रोजी स्वीकारले व २६ जानेवारी इ.स. १९५० रोजी पासून भारतीय संविधान अंमलात आले. जवाहरलाल नेहरू यांनी २६ जानेवारी इ.स. १९३० रोजी लाहोर अधिवेशनात तिरंगा फडकावून पूर्ण स्वराज्याची (स्वातंत्र्याची) घोषणा केली होती. त्याची आठवण म्हणून २६ जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमलात आणण्यासाठी निवडण्यात आला. या दिवशी देशभरात भारताच्या राष्ट्रध्वजाचे आरोहण होऊन त्याला वंदना दिली जाते. भारताचे राष्ट्रगीत म्हटले जाते आणि आदर व्यक्त केला जातो.
२८ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र भारताचे संविधान तयार करण्यासाठी मसूदा समिती स्थापना केली गेली. या समितीने संविधानाचा मसुदा तयार करून तो सभेपुढे ४ नोव्हेंबर १९४७ रोजी सादर केला. या सभेने सार्वजनिक चर्चेसाठी सभागृहात हा प्रस्ताव १६६ दिवसांसाठी खुला केला आणि २ वर्ष,११ महिने आणि १८ दिवसाच्या कालावधी नंतर समितीने हा मसुदा अंतिम केला. बरेचसे विचार विमर्श आणि सुधारणा केल्यानंतर समितीच्या ३०८ सद्स्यांनी दोन हस्तलिखित प्रती (हिंदी आणि इंग्रजी) २४ जानेवारी १९५० रोजी स्वाक्षरांकित केल्या. दोन दिवसानंतर हे भारताचे संविधान संपूर्ण राष्ट्रासाठी लागू करण्यात आले. भारताच्या संविधानाच्या निमित्ताने भारताचा प्रजासत्ताक दिन हा साजरा करण्यात येऊ लागला.
दर वर्षी २६ जानेवारी रोजी भारताच्या राजधानीत, म्हणजे नवी दिल्ली येथे, एक मोठे संचलन आयोजित केले जाते.हे संचलन रायसीना हिलपासून राष्ट्रपती भवनापर्यंत राजपथ मार्गाद्वारे जाते. संचलनाच्या अगोदर अनाम सैनिकांसाठी बनवले गेलेले स्मारक, अमर जवान ज्योती, येथे भारताचे पंतप्रधान पुष्पचक्र अर्पण करतात. भारतासाठी आपले प्राण अर्पण करणार्या वीर सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात येते. त्यानंतर पंतप्रधान राजपथाच्या मुख्य मंचावर जातात व आलेल्या पाहुण्यांना भेटतात. तितक्यात प्रमुख पाहुण्यांसोबत राष्ट्रपतींचे आगमन होते. राष्ट्रगीत सुरु होताच राष्ट्रपती ध्वजारोहण करतात व २१ तोफांची सलामी दिली जाते. त्यानंतर देशासाठी शौर्य गाजवलेल्या सैनिकांना राष्ट्रपतींच्या हस्ते अशोक चक्र आणि कीर्ती चक्र, हे मुख्य पुरस्कार देण्यात येतात. राष्ट्रीय शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेली देशातील शूर बालके सजवलेल्या हत्तीवरून किंवा वाहनावरून या संचलनात सहभागी होतात.प्रमुख पाहुणे म्हणून परराष्ट्रीय राष्ट्राध्यक्षांना निमंत्रण दिले जाते. भारतीय फौजांचे (नौदल, पायदल, वायुसेना) वेगवेगळे सेनाविभाग, घोडदळ, पायदळ, तोफखाना आणि इतर अद्ययावत शस्त्रे/ क्षेपणास्त्रे (जसे पृथ्वी, अग्नी), रणगाडे समवेत संचलन करतात. भारताचे राष्ट्रपती या फौजांची मानवंदना स्वीकारतात. या संचलनाच्या सादरीकरणाची पूर्वतयारी विशेष काळजीपूर्वक आणि शिस्तीने केली जाते इतके या संचलनाचे महत्व आहे. नवी दिल्ली येथे होणार्या संचलनाप्रमाणेच भारतातील सर्व राज्यांतही एकेक संचलन होते. प्रत्येक राज्यात त्या त्या राज्याचे राज्यपाल फौजांची मानवंदना स्वीकारतात.
स्त्रोत …. विकिपीडिया
प्रथम प्रजासत्ताक दिन म्हणजे काय हेच माहिती करून घ्याला पाहिजे कारण अनेक जणांना प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्यदिन यातील फरक माहित नसतो.
भारतीय प्रजासत्ताक दिवस हा भारताच्या प्रजासत्ताकात दरवर्षी २६ जानेवारी रोजी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे. याला गणराज्य दिन असेही म्हटले जाते. भारताचे संविधान संविधान समितीने २६ नोव्हेंबर, इ.स. १९४९ रोजी स्वीकारले व २६ जानेवारी इ.स. १९५० रोजी पासून भारतीय संविधान अंमलात आले. जवाहरलाल नेहरू यांनी २६ जानेवारी इ.स. १९३० रोजी लाहोर अधिवेशनात तिरंगा फडकावून पूर्ण स्वराज्याची (स्वातंत्र्याची) घोषणा केली होती. त्याची आठवण म्हणून २६ जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमलात आणण्यासाठी निवडण्यात आला. या दिवशी देशभरात भारताच्या राष्ट्रध्वजाचे आरोहण होऊन त्याला वंदना दिली जाते. भारताचे राष्ट्रगीत म्हटले जाते आणि आदर व्यक्त केला जातो.
२८ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र भारताचे संविधान तयार करण्यासाठी मसूदा समिती स्थापना केली गेली. या समितीने संविधानाचा मसुदा तयार करून तो सभेपुढे ४ नोव्हेंबर १९४७ रोजी सादर केला. या सभेने सार्वजनिक चर्चेसाठी सभागृहात हा प्रस्ताव १६६ दिवसांसाठी खुला केला आणि २ वर्ष,११ महिने आणि १८ दिवसाच्या कालावधी नंतर समितीने हा मसुदा अंतिम केला. बरेचसे विचार विमर्श आणि सुधारणा केल्यानंतर समितीच्या ३०८ सद्स्यांनी दोन हस्तलिखित प्रती (हिंदी आणि इंग्रजी) २४ जानेवारी १९५० रोजी स्वाक्षरांकित केल्या. दोन दिवसानंतर हे भारताचे संविधान संपूर्ण राष्ट्रासाठी लागू करण्यात आले. भारताच्या संविधानाच्या निमित्ताने भारताचा प्रजासत्ताक दिन हा साजरा करण्यात येऊ लागला.
दर वर्षी २६ जानेवारी रोजी भारताच्या राजधानीत, म्हणजे नवी दिल्ली येथे, एक मोठे संचलन आयोजित केले जाते.हे संचलन रायसीना हिलपासून राष्ट्रपती भवनापर्यंत राजपथ मार्गाद्वारे जाते. संचलनाच्या अगोदर अनाम सैनिकांसाठी बनवले गेलेले स्मारक, अमर जवान ज्योती, येथे भारताचे पंतप्रधान पुष्पचक्र अर्पण करतात. भारतासाठी आपले प्राण अर्पण करणार्या वीर सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात येते. त्यानंतर पंतप्रधान राजपथाच्या मुख्य मंचावर जातात व आलेल्या पाहुण्यांना भेटतात. तितक्यात प्रमुख पाहुण्यांसोबत राष्ट्रपतींचे आगमन होते. राष्ट्रगीत सुरु होताच राष्ट्रपती ध्वजारोहण करतात व २१ तोफांची सलामी दिली जाते. त्यानंतर देशासाठी शौर्य गाजवलेल्या सैनिकांना राष्ट्रपतींच्या हस्ते अशोक चक्र आणि कीर्ती चक्र, हे मुख्य पुरस्कार देण्यात येतात. राष्ट्रीय शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेली देशातील शूर बालके सजवलेल्या हत्तीवरून किंवा वाहनावरून या संचलनात सहभागी होतात.प्रमुख पाहुणे म्हणून परराष्ट्रीय राष्ट्राध्यक्षांना निमंत्रण दिले जाते. भारतीय फौजांचे (नौदल, पायदल, वायुसेना) वेगवेगळे सेनाविभाग, घोडदळ, पायदळ, तोफखाना आणि इतर अद्ययावत शस्त्रे/ क्षेपणास्त्रे (जसे पृथ्वी, अग्नी), रणगाडे समवेत संचलन करतात. भारताचे राष्ट्रपती या फौजांची मानवंदना स्वीकारतात. या संचलनाच्या सादरीकरणाची पूर्वतयारी विशेष काळजीपूर्वक आणि शिस्तीने केली जाते इतके या संचलनाचे महत्व आहे. नवी दिल्ली येथे होणार्या संचलनाप्रमाणेच भारतातील सर्व राज्यांतही एकेक संचलन होते. प्रत्येक राज्यात त्या त्या राज्याचे राज्यपाल फौजांची मानवंदना स्वीकारतात.
स्त्रोत …. विकिपीडिया
मंगळवार, १२ नोव्हेंबर, २०१९
करडे गाव चे आराध्य दैवत श्री भैरवनाथ देवाचा उत्सव आज कार्तिक पौर्णिमा
सालाबादप्रमाणे करडे गाव चे कुलदैवत श्री भैरवनाथ देवाचा उत्सव कार्तिक पौर्णिमा १९४१,मंगळवार
दि.१२/११/२०१९ ते १४/११/२०१९ या कालावधीत साजरा करण्यात येत आहे यावेळी ग्रामस्थांच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
१)पहाटे ५ वाजता भैरवनाथ देवाची महापूजा,
२) दुपारी ११ ते ४ ह भ प गोदावरीताई मुंडे (गंगाखेड ) यांच्या अभंगचा कार्यक्रम,
३)सायंकाळी ७ ते ८ दंडवत आणि शेरणी वाटप कार्यक्रम
४)रात्री ९ वाजता देवाच्या पालखीची मिरवणूक
५) रात्री १० वाजता रघुवीर खेडकर सह कांताबाई सातारकर यांचा लोकनाट्य तमाशा
६) रोजी सकाळी १० वाजता रघुवीर खेडकर सह कांताबाई सातारकर यांचा हजेरीचा कार्यक्रम
७)दुपारी २ ते ६ वाजेपर्यंत जंगी कुस्त्यांचा आखाडा (एकूण इनाम ५,५५,५५५ रुपये )
(टीप . सकाळी ११ ते दुपारी २ पर्यंत पैलवांची वजने घेतली जातील आधार कार्ड ,पॅन कार्ड मतदान कार्ड यापैकी एक पुरावा आवश्यक )
८)रात्री १० वाजता वैभव म्युझिकल नाईट कोल्हापूर यांचा ऑर्केष्ट्राचा कार्यक्रम होणार असल्याचे यात्रा कमिटीच्या वतीने सांगण्यात आले.
दि.१२/११/२०१९ ते १४/११/२०१९ या कालावधीत साजरा करण्यात येत आहे यावेळी ग्रामस्थांच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
- मंगळवार
१)पहाटे ५ वाजता भैरवनाथ देवाची महापूजा,
२) दुपारी ११ ते ४ ह भ प गोदावरीताई मुंडे (गंगाखेड ) यांच्या अभंगचा कार्यक्रम,
३)सायंकाळी ७ ते ८ दंडवत आणि शेरणी वाटप कार्यक्रम
४)रात्री ९ वाजता देवाच्या पालखीची मिरवणूक
५) रात्री १० वाजता रघुवीर खेडकर सह कांताबाई सातारकर यांचा लोकनाट्य तमाशा
- बुधवार
६) रोजी सकाळी १० वाजता रघुवीर खेडकर सह कांताबाई सातारकर यांचा हजेरीचा कार्यक्रम
७)दुपारी २ ते ६ वाजेपर्यंत जंगी कुस्त्यांचा आखाडा (एकूण इनाम ५,५५,५५५ रुपये )
(टीप . सकाळी ११ ते दुपारी २ पर्यंत पैलवांची वजने घेतली जातील आधार कार्ड ,पॅन कार्ड मतदान कार्ड यापैकी एक पुरावा आवश्यक )
८)रात्री १० वाजता वैभव म्युझिकल नाईट कोल्हापूर यांचा ऑर्केष्ट्राचा कार्यक्रम होणार असल्याचे यात्रा कमिटीच्या वतीने सांगण्यात आले.
- गुरुवार
१) महिलांसाठी खास महिला बाजार
वरील कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून परिसरात स्वच्छता राखन्यास सांगितली आहे ,यात्रा उत्सवाला कुठलेही गलगोट लागू नये व यात्रा शांततेत पार पडावी यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे
गुरुवार, २४ ऑक्टोबर, २०१९
गुरुवार, १५ ऑगस्ट, २०१९
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..
१५ ऑगस्ट २०१९ करडे ,
सर्व भारतवासियांना ७3 व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..आपल्या महान आणि विशाल भारत देशाचा अभिमान बाळगा , संघटित व्हा..
शनिवार, ६ एप्रिल, २०१९
बुधवार, २० मार्च, २०१९
सोमवार, ११ मार्च, २०१९
श्री भैरवनाथ यात्रेचा व्हिडिओ प्रसिद्ध
गावचे फोटोग्राफर शुभम जगदाळे यांनी आपल्या श्री भैरवनाथ देवाचा उत्सवाचा अतिशय सुंदर असा विडिओ बनवला आहे.. नक्की पहा आणि like करा , comments करा, आणि subscribe करा
brframeborder="0" allow="accelerometer; autoplay; encrypted-media; gyroscope; pic />
brframeborder="0" allow="accelerometer; autoplay; encrypted-media; gyroscope; pic />
गुरुवार, ७ मार्च, २०१९
'गुरुकृपा व्हेज' या फॅमिली रेस्टॉरंट च्या उदघाटन प्रसंगी
करडे गावातील युवा उद्योजक प्रवीण वाळके आणि गणेश वाघमारे यांच्या 'गुरुकृपा व्हेज' या फॅमिली रेस्टॉरंट च्या उदघाटन प्रसंगी मा.नामदार माजी उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब ,डाॅ अमोल कोल्हे , मा. प्रदिपदादा विद्याधर कंद व पंचक्रोशीतील मान्यवर हे उपस्थिति होते ,अभिनेत्री सायली पाटील यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली ,यावेळी ऑर्केस्ट्रा चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
सर्व अत्याधुनिक फर्निचर व सुविधांयुक्त हे हॉटेल आहे, याठिकाणी फॅमिली साठी उत्तम सोय करण्यात आली आहे ,वाढदिवस व फॅमिली पार्टी साठी स्वतंत्र सोय करण्यात आली आहे
प्रत्येकाने एक वेळ भेट दयावे असे हे हॉटेल आहे.
बुधवार, २७ फेब्रुवारी, २०१९
आज मराठी राजभाषा दिन!!!!
मायबोलीसाठी काहीतरी
आज मराठी राजभाषा दिन!!!!
🌹🌹🌹🌹🌹
°°¶¶°°शोधावया भाकरीला निघाली
ती भूक आहे...°°¶¶°°
°°¶¶°°जन्मताच गरीबी येते
ही कुणाची चूक आहे...°°¶¶°°
°°¶¶°°भूक लागली की खाणे
ही प्रकृती आहे...°°¶¶°°
°°¶¶°°भूक नसतांना खाणे
ही विकृती आहे...°°¶¶°°
°°¶¶°°घासातील घास
दुसऱ्याला देणे ही
मराठी माणसाची
संस्कृती आहे°°¶¶°°🍃
🍀!! मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!🍀
🌹🌹🌹🌹
अनेक मराठी बंधु भगिनींनी आपल्या मराठी जनांना शुभेच्छांचे
शुभ संदेश समाजमाध्यमांतर्फे पाठवले पण आपण ज्या भ्रमणध्वनी संचाच२ उपयोग
करून संदेश पाठवले त्या भ्रमणध्वनी संचाची भाषा मात्र इंग्रजी,ज्या
प्रणालीचा वापर केला त्या प्रणालीची भाषा सुद्धा इंग्रजीच ,याचा अर्थ असा
होतो की मराठी ही फक्त आपण एक दिवस साजरा करण्यापुरतीच मर्यादित ठेवली
आहे.बाळासाहेब ठाकरेंनी ज्यावेळी स्थानिकांच्या प्रश्नांबद्दल आवाज उठवला
त्या वेळेस ते म्ह़णायचे "तुमच्या घरातील भांडी घासणारी बा़ई सुद्धा
मराठीच पाहिजे" एव्हढी अपेक्षा मी तुमच्याकडुन करत नाही मात्र निदान आपली
अस्मिता टिकवण्यासा़ठी भ्रमणध्वनीपासुन ते मिठाईच्या दुकानापर्यंत
मरा़ठीचा वापर व्हाढवा, प्रत्येक परकीय भाषेतील शब्दाला मराठी शब्द
शोधण्याचा त्रास घेतला तर नक्कीच आपली मराठी वेगळ्या उंचीवर जाऊन पोहोचेल
याची १००% खात्री आहे
#मायबोलीमराठी
#अभिजात मराठी
#आंरराष्ट्रीय मराठी
आज मराठी राजभाषा दिन!!!!
🌹🌹🌹🌹🌹
°°¶¶°°शोधावया भाकरीला निघाली
ती भूक आहे...°°¶¶°°
°°¶¶°°जन्मताच गरीबी येते
ही कुणाची चूक आहे...°°¶¶°°
°°¶¶°°भूक लागली की खाणे
ही प्रकृती आहे...°°¶¶°°
°°¶¶°°भूक नसतांना खाणे
ही विकृती आहे...°°¶¶°°
°°¶¶°°घासातील घास
दुसऱ्याला देणे ही
मराठी माणसाची
संस्कृती आहे°°¶¶°°🍃
🍀!! मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!🍀
🌹🌹🌹🌹
अनेक मराठी बंधु भगिनींनी आपल्या मराठी जनांना शुभेच्छांचे
शुभ संदेश समाजमाध्यमांतर्फे पाठवले पण आपण ज्या भ्रमणध्वनी संचाच२ उपयोग
करून संदेश पाठवले त्या भ्रमणध्वनी संचाची भाषा मात्र इंग्रजी,ज्या
प्रणालीचा वापर केला त्या प्रणालीची भाषा सुद्धा इंग्रजीच ,याचा अर्थ असा
होतो की मराठी ही फक्त आपण एक दिवस साजरा करण्यापुरतीच मर्यादित ठेवली
आहे.बाळासाहेब ठाकरेंनी ज्यावेळी स्थानिकांच्या प्रश्नांबद्दल आवाज उठवला
त्या वेळेस ते म्ह़णायचे "तुमच्या घरातील भांडी घासणारी बा़ई सुद्धा
मराठीच पाहिजे" एव्हढी अपेक्षा मी तुमच्याकडुन करत नाही मात्र निदान आपली
अस्मिता टिकवण्यासा़ठी भ्रमणध्वनीपासुन ते मिठाईच्या दुकानापर्यंत
मरा़ठीचा वापर व्हाढवा, प्रत्येक परकीय भाषेतील शब्दाला मराठी शब्द
शोधण्याचा त्रास घेतला तर नक्कीच आपली मराठी वेगळ्या उंचीवर जाऊन पोहोचेल
याची १००% खात्री आहे
#मायबोलीमराठी
#अभिजात मराठी
#आंरराष्ट्रीय मराठी
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)


















